तुळजापूर- लातूर राष्ट्रीय महामार्गांवर पुन्हा अपघात, भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; १५ ते २० प्रवासी गंभीर
लातूर प्रतिनिधी:–
ज्या रस्त्याने माजी आ आर टी देशमुख यांचा बळी घेतला त्या तुळजापूर -लातूर महामार्गावरील आशीव पाटी नजिक आज पहाटे दोन प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असूण १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत.
तीन दिवसा पूर्वी तुळजापूर ते लातूर या राष्ट्रीय महामार्ग वरिल बेलकुंड नजिक माजी आ आर टी देशमुख यांच्या फौर्चूनर गाडीचा भीषण अपघात होऊन यात त्यांचा दुर्देवी अनंत झाला असून ही घटना ताजी असतानाच आज पहाटे याच रस्त्यावर बेळकुंड पासून 5 कि मी अंतरावर असलेल्या आशीव पाटी नजिक 2 ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाला आहे
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून लातूरकडे जात असलेल्या एका खासगी बसने दुसऱ्या खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.